Additional information
लेखक | दामोदर धर्मानंद कोसंबी |
---|---|
भाषांतर | अवधूत डोंगरे |
पृष्ठसंख्या | 128 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.
प्रस्तुत पुस्तकामध्ये विविध विषयांवरचे निबंध आहेत. हे निबंध दुराग्रही बुद्धिजीवींना कदाचित संतापजनक वाटतील, पण महत्त्वाच्या वैचारिक / सामाजिक प्रश्नांची वैध उत्तरं शोधू पाहाणाऱ्यांच्या विचारप्रक्रियांना चालना देणं हा या लेखनामागचा मूळ उद्देश जाणवतो. नेतृत्व आवश्यक असतं का? समूह पातळीवरचे सर्व बदल अपरिहार्य असतील, तर व्यक्तीनं काहीच करायची गरज नाही का? स्वातंत्र्योत्तर भारतातील सत्ताधारी वर्गाचं स्वरूप कसं आहे? चीनमधील क्रांतीचं स्वरूप कसं होतं? विज्ञान आणि वैज्ञानिकांचं स्वातंत्र्य म्हणजे काय? ‘आतला आवाज’ नेहमी सुरक्षित मार्गदर्शन करतो का? सॉक्रेटीसच्या वादविवादपद्धतीचा तत्कालीन ग्रीक वर्गरचनेशी काय संबंध होता? दयाभावानं भारलेला बौद्ध धर्म आपल्या देशातून विरून का गेला? १८५७च्या उठावाचं महत्त्व काय होतं? संस्कृत साहित्य वर्गीय पूर्वग्रहापासून मुक्त आहे का? जागतिक शांततेच्या वाटेमधील अडथळे ठरणारे घटक दूर करता येतील का? – अशा विविध प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे, आणि कोसंबी म्हणतात त्याप्रमाणे या प्रक्रियेत सर्वांत महत्त्वाची आहे ती उत्तर शोधण्यासाठी वापरलेली ‘विरोधविकासी भौतिकतावाद’ ही पद्धती!
लेखक | दामोदर धर्मानंद कोसंबी |
---|---|
भाषांतर | अवधूत डोंगरे |
पृष्ठसंख्या | 128 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.