Additional information
संपादक | विलास रणसुभे |
---|---|
पृष्ठसंख्या | 128 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹160.00.₹140.00Current price is: ₹140.00.
श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर आयोजित कॉम्रेड अविनाश पानसरे स्मृती व्याख्यानमालेत प्रतिवर्षी एक विषय निवडला जातो. सदरचा विषय तत्कालीन परिस्थितीशी सुसंगत असतो. एकाच विषयाचे वेगवेगळे भाग करून सलगपणे आठ दिवस तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. अशा रीतीने जनजागृतीला व चळवळीला पूरक कार्य श्रमिक प्रतिष्ठानद्वारे केले जाते. या व्याख्यानमालेतील भाषणे ग्रंथरूपात प्रसिद्ध केली जातात. त्यामुळे व्याख्यानांचा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा हा श्रमिक प्रतिष्ठानचा उद्देश सफल होतोय.
२००७ सालचा विषय ‘जात वर्ग व परिवर्तनाचा लढा’ असा निवडण्यात आला होता. १९८० सालापासून भारतीय राजकारणात जलद गतीने होणाऱ्या आंतरबाह्य बदलांमध्ये जात व वर्गाचे स्वरूप कसे पालटत आहे आणि परिवर्तनाची दिशा योग्य आहे की नाही याबाबतची चर्चा या व्याख्यानांत करण्यात आली. उमेश बगाडे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. यशवंत सुमंत, उत्तम कांबळे, डॉ. आ. ह. साळुंखे आणि डॉ. रावसाहेब कसबे अशा महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांच्या व्याख्यानांचे हे संकलन.
संपादक | विलास रणसुभे |
---|---|
पृष्ठसंख्या | 128 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.