Additional information
लेखक | रामराव झुंजारे |
---|---|
पृष्ठसंख्या | 310 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹325.00.₹275.00Current price is: ₹275.00.
एका बाजूला विदारक आर्थिक परिस्थितीला तोंड देत आयुष्य ओढणं आणि दुसऱ्या बाजूला समाजात जगताना आपली अस्मिता मिळवून ती जपणं अशा दुहेरी पण अटळ झगड्यातून माणसाची अवस्था निश्चितच दयनीय होते. आपलं रहाटगाडगं व्यवस्थित चालावं म्हणून वाट्याला येणाऱ्या कुतरओढीमुळे समाजाचे, राष्ट्राचे – तथाकथित मुख्य प्रवाहाचे म्हणून जे प्रश्न आहेत त्यापासून सामान्य माणूस सतत दूरच फेकला जातो. म्हणून तरल संवेदनशीलता आणि सजगता अंगी असूनही अशा संघर्षाची परिणती दुर्दैवाने समूहाचे प्रश्न न सोडवता येण्याच्या नामुष्कीच्या जाणिवेत होते. ग्रामीण भागातील अशा हाताबाहेर जाणाऱ्या प्रश्नाची मांडणी ‘जलमबेडी’त केलेली आहे. डॉ. आंबेडकरांनी आवश्यक मानलेले शिक्षणाचे आणि संघर्षाचे वारे देशभरात पोहचले खरे, आधीच्या काही पिढ्या त्यामुळे शहाण्या झाल्याही, पण आपल्या निर्घृण समाजव्यवस्थेतील वैयक्तिक स्वार्थ आणि जातीय चढाओढ यांत अजूनही रममाण असलेल्या मूठभर संधिसाधूंमुळेच माणसाच्या मनातली जातीची भावना दुर्दैवाने अजूनही अखंडच राहिली आहे. पर्यायाने माणूस हा अखिल मानवतेपासून काहीसा दूरच आहे असं विचारप्रवृत्त करायला लावणारं विधान ‘जलमबेडी’त आहे.
लेखक | रामराव झुंजारे |
---|---|
पृष्ठसंख्या | 310 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.