Additional information
लेखक | मोहन कुंभार |
---|---|
पृष्ठसंख्या | 96 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹140.00.₹120.00Current price is: ₹120.00.
आधुनिकीकरणाच्या टप्प्यावर गावांची प्रचंड पडझड होत आहे. भौतिक साधने व यंत्रसामग्रीच्या धावत्या गतीमुळे मानवी जीवनाचा कायाकल्प अपरिहार्य ठरतो आहे. नवी मने घडत आहेत. जागतिकीकरणाने प्रभावित काळाचे दृश्य स्वरूपाबरोबरच मानवी आंतरिकतेवरही आघात होत आहेत. हा कालबदलातील दुभंग, पेच मोहन कुंभार यांच्या कवितेत मध्यवर्ती आहे.
नगरकेंद्री मानवी कोलाहलाचा अटीतटीचा संघर्ष या कवितेत आहे. शहर आणि गाव या द्वंद्वसमासातून तो व्यक्त झाला आहे. तो भूत आणि वर्तमानाशी सांधलेला आहे. शहरकेंद्री मूल्यांच्या चौखूर आक्रमणाची नोंद या कवितेत आहे. एका अर्थाने भूमी, प्रदेश व संस्कृतीवरील हे आक्रमण आहे. भूतकाळातील विसाव्याच्या सावलीतून त्याच्या वाट्याला आलेल्या परके व पोरकेपणाची जाणीव आहे. याचा शेवट काय असेल या भीतीचे सावट तीवर आहे. मायनिंगरूपाने शेती व प्रदेश बेचिराख करणाऱ्या काळ्या सावलीचे गडद सूचन या कवितेत आहे. वर्तमानातल्या क्षणांना तोलून धरणारी विसाव्याच्या सृष्टीतील ओलाव्याची क्षणचित्रे या संवेदनशीलतेत आहेत. ती संयत अशा भाषारूपातून व तळकोकणी बोलीचिन्हांच्या लयींतून अवतीर्ण झाली आहेत. भूमी, निसर्ग व मानवी जगावर होणाऱ्या आक्रमणाची नोंद यंत्रसंस्कृतीशी निगडित हिंस्र प्रतिमांमधून घेतली गेली आहे. मनुष्य व निसर्गजीवनातला अस्वस्थ कालस्वर जगण्याची गाथामधून व्यक्त झालेला आहे.
– रणधीर शिंदे
लेखक | मोहन कुंभार |
---|---|
पृष्ठसंख्या | 96 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.