Additional information
संपादक | रणधीर शिंदे |
---|---|
पृष्ठसंख्या | 192 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹225.00.₹200.00Current price is: ₹200.00.
पश्चिम महाराष्ट्रातील एका टोकावरील गडहिंग्लज, गारगोटी या कर्नाटकाच्या सीमेलगत असणाऱ्या प्रदेशाची पार्श्वभूमी राजन गवस यांच्या घडणीमागे आहे. तेथील वैचारिक / सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाने त्यांचा मनःपिंड घडला आहे. ऐशीच्या दशकात महाराष्ट्रातील काही भागात नव्या समाजजागरणाच्या चळवळी कार्यरत झाल्या. यापैकीच एक गडहिंग्लजच्या परिसरात देवदासी प्रथेविरुद्ध जोमदार चळवळ कार्यरत झाली. या चळवळीत राजन गवस यांचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग होता. त्यांच्या एकंदरीतच समग्र साहित्यावर कृषिसंस्कृतीत अस्तित्वात असणाऱ्या या समष्टिकेंद्री जीवनदृष्टीचा प्रभावी परिणाम झाला आहे.
समकालीन कवेतील त्यांचे वेगळेपण म्हणजे त्यांच्या कक्षेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. गावाचा म्हणून एक संवेदनस्वभाव असतो, तो या जीवनदृष्टीतून साकारला आहे. कृषिसंस्कृतीतील विविध तऱ्हेचे संबंध, समूहमानस, नवे सत्तासंबंध, जातीयतेची उतरंड याबद्दलचा जीवनार्थ ही कथा व्यक्त करते. आधुनिक काळातील शहरकेंद्रित मूल्यदृष्टीचे ग्रामीण जीवनात पसरणारे लोण, व त्यामुळे या लोकमानसामध्ये घडलेल्या पालटाचे, स्थित्यंतराचे त्यातील ताणाचे चित्रण ही कथा करते.
– रणधीर शिंदे ( प्रस्तावनेतून )
संपादक | रणधीर शिंदे |
---|---|
पृष्ठसंख्या | 192 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.